शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कागल तालुका : उसाच्या वजनात हेक्टरी सरासरी १० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:14 IST

कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक

ठळक मुद्देकारखान्याचा ९० दिवसांचा हंगाम सुरळीत; मार्चअखेरपर्यंत हंगाम चालणार

जहाँगीर शेख ।कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक करीत असल्या तरी हंगामात नैसर्गिकरीत्या उसाचे टनेज वाढल्याने आणि त्याची सरासरी हेक्टरी १० टक्के इतकी असल्याने कारखान्यांना उसाची पुरेशी उपलब्धता होत आहे. उलट तोडणी-वाहतूक यंत्रणा अपुरी पडण्याचे प्रकार घडत आहे.

तालुक्यात दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हे साखर कारखाने आहेत, तर पंचगंगा इचलकरंजी, जवाहर-हुपरी, राजाराम-कोल्हापूर, व्यंकटेश्वरा-बेडकीहाळ, हालसिद्धनाथ-निपाणी, गुरुदत्त-टाकळी असे साखर कारखानेही तालुक्यात उसाची तोडणी करीत आहेत. एकीकडे उसाचे क्षेत्र फारसे वाढलेले नाही; मात्र उसाच्या टनेजमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही टनेज वाढ सरासरी हेक्टरी दहा ते बारा टन आहे. यामुळे कारखान्यांनाही उसाचा पुरवठा वाढला आहे. साधारणत: मार्चअखेर हंगाम चालण्याची शक्यता आहे.

आपला ऊस लवकर तुटावा म्हणून शेतकरी वर्ग ऊसतोडणी मजुरांना, त्यांच्या टोळ्यांना चुचकारत आहेत. तालुक्यातील साखर कारखान्यांनी ९० दिवसांचा यशस्वी हंगाम पूर्ण केला आहे. या हंगामात साधारणत: पाच महिने साखर कारखाने चालतील. यापैकी संताजी घोरपडे साखर कारखाना सर्वांत आधी चालू झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांना हा हंगाम सुरळीत आणि चांगला जात आहे.सहकारी साखर कारखान्यांचे गाळप६ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपला ९० दिवसांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू साखर कारखान्याने पाच लाख ४४ हजार ३३० मे. टन उसाचे गाळप करीत १२.०५ टक्के साखर उतारा घेत ६ लाख ४० हजार ५५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे. बिद्री साखर कारखान्याने चार लाख ५० हजार ४२२ मे. टन उसाचे गाळप करीत १२.७० टक्के उताºयाने ५ लाख ६९ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर हमीदवाडा-मंडलिक कारखान्याने ३ लाख ६१ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी १२.३१ टक्के उताºयाने ४ लाख ४२ हजार १५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे.

तालुक्यातील दोन लाख मे. टन ऊस वाढला४कागल तालुक्यातील साधारणत: १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१७ मध्ये पडलेल्या पावसाने आणि पूरक हवामानामुळे ऊस पिकाला मोठा लाभ होऊन उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गतवेळीपेक्षा हेक्टरी सरासरी १० ते १२ टन उसाचे जादा उत्पादन निघत आहे. सरासरी दोन लाख मे. टन ऊस वाढल्यासारखा हा प्रकार आहे. हा टनेजवाढीचा प्रकार लक्षात घेऊन साखर कारखानेही फेब्रुवारी २०१८ मध्ये ज्या कारखान्यांचे गाळप बंद होतात त्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.